जिल्हाराजकीयसामाजिक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलीस रूट मार्च ; शांततेत यशस्वी आयोजन…

उरुळी कांचन : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १२.०० या कालावधीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हा रूट मार्च शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.
सदर रूट मार्च उरुळी कांचन पीएमटी चौक येथून सुरू होऊन आश्रम रोड, जय मल्हार रोड, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, तळवाडी चौक मार्गे शेवटी पुन्हा पीएमटी चौकपर्यंत पार पडून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. रूट मार्चदरम्यान पोलीस दलाने प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांमध्ये उपस्थिती दर्शवली.

या रूट मार्चमध्ये एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक तसेच सुमारे ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

रूट मार्चदरम्यान नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून निवडणूक काळात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अप्रत्यक्षपणे देण्यात आला. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च यशस्वीरीत्या पार पडला. निवडणूक कालावधीत अशाच प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??