देश विदेश

आता अपघातात जखमींना मदत केल्यास मिळणार २५ हजार, नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना…

दिल्ली : भारतात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेवर उपचार म मिळाल्यानं हजारो लोकांचा मृत्यू होतो. नागरिकांचे अशा प्रकारचे मृत्यू आणि असे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने पावलं उचलत आहे.

       सोमवारी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणाऱ्या लोकांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केलीय. सरकार ही रक्कम वाढवून २५ हजार रुपये अशी केलीय. सध्या सरकार पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देते.

       केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना ही घोषणा केली. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत एका मुलाखतीवेळी नितीन गडकरी यांनी मंत्रालयाला बक्षीसाची रक्कम वाढवण्याचे आदेश दिले. गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात वेळेवर दाखल करणं गरजेचं असतं. अपघातातील जखमी लोकांना गोल्डन आवर म्हणजेच एका तासाच्या आता रुग्णालयात नेलं गेलं तर त्यांच्या वाचण्याची शक्यता जास्त वाढते.

         केंद्र सरकारकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये एक योजना सुरू करण्यात आली होती. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी या उद्देशाने योजना सुरू केलेली. सध्या या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तींना बक्षीसाच्या रकमेसह प्रमाणपत्र दिलं जातं.

         काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात लोकांचा जीव वाचवणाऱ्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंटची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, रस्त्यावर जर एखाद्याचा अपघात झाला तर त्या व्यक्तीवर कॅशलेस उपचार केले जातील. याचाच अर्थ सरकार त्या व्यक्तीच्या उपचाराचा खर्च करेल. हा उपचार ७ दिवसांपर्यंत असेल आणि यात जास्ती जास्त दीड लाख रुपयांपर्यंत सरकार खर्च करेल. मार्च महिन्यात ही योजना सुरू केली जाईल.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??