जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महाराष्ट्रातील सर्वात मोठी मतचोरी? यशोमती ठाकूर यांचा आकडेवारीसह घोटाळ्याचा भांडाफोड…

तिवसा व अमरावतीत लाखोंची मतदार कपात; “35 हजारांहून अधिक मते चोरीला गेली” असा गंभीर आरोप...

पुणे : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव, काहींचा अगदी काठावर विजय, आणि काही ठिकाणी झालेल्या मतदार कपातीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघातून पराभूत झालेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीसह दावा केला आहे की, महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत “सर्वात मोठी मतचोरी” झाली.

तिवसा मतदारसंघातील आकडेवारी…

2009 : 2,43,802 मतदार

2014 : 2,70,408 (5 वर्षांत 26,606 वाढ)

2019 : 2,95,992 (5 वर्षांत 25,584 वाढ)

2024 लोकसभा : अपेक्षित संख्या 3,20,000 असताना, प्रत्यक्ष फक्त 2,84,243 — म्हणजे 11,749 मतांची घट आणि नैसर्गिक वाढ धरून एकूण 36,000 मतांची कपात.

2024 विधानसभा (6 महिने नंतर) : अचानक वाढ — 2,96,495 (6 महिन्यात 12,252 मते वाढली).

ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला की, 5 वर्षांत घटलेले मतदार अचानक 6 महिन्यांत कुठून वाढले? ही कपात व वाढ कोणाच्या हितासाठी झाली?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील घडामोडी…

2009 : 14,23,855 मतदार

2014 : 16,12,739 (1,88,884 वाढ)

2019 : 18,33,091 (2,20,352 वाढ)

2024 : 18,38,768 — फक्त 5,677 वाढ (म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख मते कपात).

अशा कपातीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसचे बळवंत वानखडे हे 20,000 मतांनी विजयी झाले. ठाकूर यांचा दावा आहे की, कपात झाली नसती तर विजयाचा फरक 1 लाखाहून अधिक मतांचा झाला असता.

यशोमती ठाकूर यांचे आरोप…

तिवसा मतदारसंघातून काँग्रेस विचारसरणीची 25 हजार मते वगळून, भाजप विचारसरणीची मते समाविष्ट केली गेली असावी.

मतदार याद्या मागवल्यानंतर एक्सेल फाईलमधून जवळपास 14 हजार बोगस मते उघडकीस आली.

मतचोरी रोखण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू असून, गडबड झालेल्या मतदारसंघांची स्वतंत्र यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे.

आवश्यक असल्यास हा मुद्दा कोर्टात नेण्याची तयारी असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

               पार्श्वभूमी…

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला होता, परंतु अवघ्या 6 महिन्यांत विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचा पराभव झाल्याने संशयाची साखळी निर्माण झाली. मतदार यादीतील कपात आणि अनैसर्गिक वाढीच्या आकडेवारीमुळे “मतचोरी” हा मुद्दा आता राज्याच्या राजकारणातील गरम विषय बनला आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??