सामाजिक

एकेकाळी गाजवलं बॉलिवूड! ३०० हून अधिक चित्रपट करूनही झाला दारुण अंत; महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला…

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी कधी कोणाचं भाग्य उजळवते तर कधी एका क्षणातच अंधारात लोटते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ८० आणि ९० च्या दशकात आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे अभिनेता महेश आनंद यांचा शेवट अतिशय वेदनादायी झाला.

‘शहंशाह’, ‘हथियार’, ‘मुजरिम’, ‘तूफान’ अशा गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केलं. पडद्यावर त्यांची एक झलक जरी दिसली तरी सिनेरसिकांना दाद द्यावीशी वाटे. मात्र, वैयक्तिक आयुष्य आणि आर्थिक संकटांमुळे ते कायम चर्चेत राहिले.

५ लग्न, तरीही एकाकी शेवट…

महेश आनंद यांच्या लव्ह लाईफबद्दलही अनेकदा गॉसिप कॉलम रंगले. त्यांनी एकामागून एक पाच लग्नं केली. पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉय यांच्या बहिणी बरखा रॉयसोबत, तर दुसरं मिस इंडिया इंटरनॅशनल मारिया एरिका डिसूझाशी केलं. नंतर १९९२ मध्ये मधु मल्होत्रा, २००० मध्ये उषा बचानी आणि शेवटी एका रशियन महिलेशी विवाह केला. मात्र, कोणतंच नातं टिकू शकलं नाही.

शेवटच्या क्षणीही पैशांचा अभाव…

तब्बल ३०० चित्रपट केल्यानंतरही महेश आनंद यांच्या हाताला शेवटच्या काळात काम नव्हतं. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की पाणी विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा शेवटचा चित्रपट होता ‘रंगीला राजा’.

कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह…

एकेकाळचा हा यशस्वी अभिनेता वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह बराच वेळ पडून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. त्यांच्या फेसबुकवर काही मेसेज आढळले होते ज्यातून ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी आसुसले असल्याचं समजतं.

बॉलिवूडमधील एका यशस्वी पण दुर्दैवी कलाकाराचा हा शेवट ऐकून सिनेसृष्टी हादरली होती.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??