महाराष्ट्र

खानपान ही विशिष्ट जातीधर्म प्रदेशाशी निगडित गोष्ट नसून मानवाची संस्कृती ; सोहेल हाश्मी…

पुणे : विशिष्ट खाणं हे विशिष्ट जातधर्माशी जोडून त्याविरोधात प्रचार केला जातो. त्यातून शुद्ध खाणं आणि शाकाहार याचा प्रचारही केला जातो. मात्र खानपान ही मानवाची संस्कृती आहे, संस्कृती प्रवाही होती, आहे आणि पुढेही राहील, ती प्रवाही असणं हे मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

          आज बहुराष्ट्रीय कंपन्या भुकेचा धंदा करून बी. टी. बियाणांचा व्यवसाय करत असून त्या जे ताटात वाढतील ते (विष) खावं लागणार आहे, हा धोका ओळखून वेळीच जागं होत खानपान ही संस्कृती टिकवून ठेवणं आपल्याच हातात आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, फिल्म मेकर सोहेल हाश्मी यांनी केले. लोकायत, ज्ञानभरती, अलर्ट आणि राजीव गांधी स्मारक निधी आयोजित भारत एक खोज व्याख्यानमालेत दुसरे व्याख्यान भारत के स्वाद अंतर्गत बोलत होते.

          ते बोलताना पुढं म्हणाले की उत्तर भारतीयांचं खाणं म्हणजे भारतीय खाणं हे पसरवलं जात आहे, पण काय तामिळनाडू, केरळ, ईशान्यपूर्वीकडील राज्य ही भारतीय नाहीत? का त्यांचं खाणं भारतीय खाणं नाही? या प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागेल. ईशान्यपूर्वेकडील राज्यांचं खाणं चायनीज म्हणून विकलं जात आहे. कोणत्याही भाज्या-पालेभाज्या आणि हाडं खाता येतील अशी निसर्गाने मानवाच्या दातांची रचना केलेली आहे, कारण माणूस मूलतः मांसाहार करत होता. शुद्ध शाकाहार असं काही नाही. पनीर, तूप यासारखे पदार्थ प्राणिज पदार्थ आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज प्रश्न शाकाहार का मांसाहार हा नसून बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या देशातली खाण्यातली विविधता समूळ नष्ट करून बी.टी. बियाणांचा धंदा करत आहेत, ज्यामुळे खाण्यातली विविधता नष्ट होण्याबरोबर शेतकरी देशोधडीला लागत आहे, आपल्या ताटात विष वाढलं जात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच मानवाची म्हणून असलेली खाण्यापिण्यातली विविधता संस्कृती टिकवता येईल.

         व्याख्यानमालेमागचा उद्देश असणारं प्रास्ताविक लोकायतचे समन्वयक नीरज जैन यांनी मांडलं तर सूत्रसंचालन रुषल हिना यांनी केलं. यावेळी ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाला उपस्थितांनी केकचा आस्वाद घेतला.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??