राजकीय

पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती वेगवेगळा कार्यभार सांभाळणार ; सविस्तर बातमी..

पुणे : राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार काल पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे.

यात पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार आहेत. याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे. जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) आहेत, तर शेखर सिंह डुडी यांचे मेहुणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सातारा जिल्ह्याचे जितेंद्र डुडी यांना पदस्थापना देण्यात आली आहे.

                   कोण आहेत जितेंद्र डुडी?

जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१६ च्या शाखेतील सनदी अधिकारी आहेत. ते मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत झारखंड येथून सुरुवात केली असून, केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्रात पदस्थापना देण्यात आली. पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार सांभाळला आहे. सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??