जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) लागू…

२२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी; शस्त्रे, मिरवणुका व घोषणांवर निर्बंध...

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ (Bombay Act No. XXII of 1951) मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, फेकावयाची हत्यारे, तलवारी, भाले, काठ्या, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच, कोणत्याही व्यक्तीचे किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे किंवा छायाचित्रांचे प्रदर्शन व दहन, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे, सभ्यता व नीतिमत्तेला धक्का पोहोचेल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा स्वरूपाची आवेशपूर्ण भाषणे, कृती किंवा साहित्य तयार करून त्याचा प्रसार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे

कलम ३७ (३) अन्वये पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव, तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, मिरवणूक किंवा आंदोलन काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील कर्मचारी तसेच कर्तव्य बजावताना अधिकृत परवानगीने शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??