महाराष्ट्र

पुणे रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी,; पुणे वाहतूक कोंडी पासून मोकळा स्वास घेणार?

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या पातळीवर उपाययोजना होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून कामाला वेगाने सुरुवात होणार आहे.

               निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

     रिंग रोड प्रकल्पाची कामे १२ टप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत. यातील नऊ टप्प्यांसाठी कंत्राटे आधीच मंजूर करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित तीन टप्प्यांसाठी सोमवारी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या, ज्यामध्ये कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या बोली सादर केल्या आहेत.

             कंत्राट मिळवण्यासाठी ‘या’ कंपन्या शर्यतीत

       दोन टप्प्यांसाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने, तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सने सर्वांत कमी बोली लावली आहे. त्यामुळे या कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंत्राटाची अंतिम घोषणा लवकरच केली जाणार आहे.

                           रिंग रोड प्रकल्प

         वाहतूक कोंडीवर तोडगा काढणारा हा रिंग रोड प्रकल्प पुण्यातील खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यांमधून जाणार आहे. यासाठी ४४ गावांमधील जमिनीचे भूसंपादन सुरू असून रिंग रोड अंदाजे १५ ते २० किलोमीटरच्या परिघात बांधला जाणार आहे. या रस्त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्याची गरज उरणार नाही. वाहनचालक रिंग रोडचा वापर करून थेट शहराच्या बाहेरून पुढे प्रवास करू शकतील.

               वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?

      पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक समस्या दूर करण्यात हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे. रिंग रोड सुरू झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील दबाव कमी होईल, तसेच बाहेरील वाहनांचा शहरावर होणारा ताण पूर्णपणे दूर होईल. हा प्रकल्प पुणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरत असून वाहतूक व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल घडवणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??