जिल्हा

गाडीच्या केबिनचा चक्काचूर, ५० प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात…

 

पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका खासगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली आहे.

या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. भल्या पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा अपघात घडले. यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवासी साखर झोपेत होते. याचवेळी हा अपघात घडला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी बराच वेळ गोंधळ बघायला मिळाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे हा अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर अपघात घडल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या ड्रायव्हर केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस चोपडा येथून पुण्याच्या दिशेनं येत होती. पुणे – नाशिक महामार्गावरून जात असताना आळेफाटा येथे या बसला अपघात झाला. यावेळी बसचा वेग जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. ज्यावेळी बसचा अपघात झाला, तेव्हा बसमधून प्रवास करणारे ४० ते ५० प्रवाशी साखर झोपेत होते. अशात अपघात झाल्याने अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहाटे चार ते पाच च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी बसचालकाने मद्यप्राशन केलं होतं का? नेमका अपघात कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??