कृषी व्यापारजिल्हासामाजिक

रोहित्र चोरांचा धुमाकूळ ; सहा महिन्यांत ३९ चोरी! चोरांचा सुळसुळाट, ; पुर्व हवेली.

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, आष्टापूर, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील परिसरातील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पाणी असून, पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील जवळपास सहा महिन्यांत ३९ रोहित्रांची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या सात आठ महिन्यापासून नदी पट्ट्यातील कोरेगाव मूळ, भिवरी, थेऊरसह परिसरातील गावांमधून रोहित्रांची चोरी होत असल्याच्या घटना सातत्याने घटत आहेत. अनेक गावांतील निर्मनुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती, शेतातील परिसरातील विद्युत रोहित्र चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.

              पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचे शेतकरी…

तांब्याचे वाढलेले भाव यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रारी यापूर्वी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासन याबाबत शोध घेत नसून, या गंभीर घटनेची दखन न घेता याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी शंका परिसरातील शेतकरी व नागरिकांना येत आहे. चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलिस खात्यास माहीत नाही का, अशी चर्चा नागरिक आपसांत करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलिस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास पाणी न मिळाल्याने शेतीमालाचे नुकसान होते.

                             तांबे जवळपास ७०० रुपये किलो… 

चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे १०० ते १२० किलो तांबे असते. त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे ७० ते ८० हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑईलची देखील विक्री केली जाते.

          अंधाराचा फायदा, चोरट्यांनी चोरी करण्याचे प्रमाण वाढवले. 

गेल्या सहा महिन्यात सुमारे ३९ विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणाऱ्या‍ विद्युत रोहित्राच्या जागी नवीन जनित्र बसविण्यास जवळपास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. शेतातील पोलवर वीज वितरणाची लाईटचीही व्यवस्था अपुरी असल्याने चोरांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत वीज वितरणाने लक्ष दिले पाहिजे असे शेतकरी चर्चा करतात.

                                   पोपट साठे (शेतकरी)
                        ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष

रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत पोलीस प्रशासन कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना ह्या होतच राहणार आहेत. पकडलेल्या अशा टोळ्यांवर पोलीस प्रशासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वारंवार रोहित्र चोरीच्या घटनांही होत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवून चोरांना पकडावे व शेतकऱ्यांचे अतोनात होणारे नुकसान टाळावे.

                                           म. भ. धाडवे
                               उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन

वीज वितरणमार्फत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून पत्र व्यवहार, ही करण्यात आला आहे. शेतातील रोहित्र चोरीला जावू शकतात याची यादी पोलीस प्रशासनाने मागितली असता यादी देण्यात आली आहे. मागील हप्त्यात पोलीस प्रशासन, वीज वितरण याची बैठकीत रोहित्राच्या ठिकाणी सी सी टिव्ही व अलार्म याची व्यवस्था शेतकरी यांना करायची आहे असे पोलीस प्रशासना कडून सांगण्यात आले आहे. असे यावेळी सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??