सामाजिक

मृत्यू पूर्वी जमीन, मालमत्तेची वाटणी, पहिला हक्क कोणाचा? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर

मुंबई : आपल्या देशात कायद्यानुसार मृत्युपत्र हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, जो व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे वितरण कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन करतो. या दस्तऐवजात अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासंदर्भातील तरतुदी देखील समाविष्ट असू शकतात.

मात्र, मृत्युपत्र तयार करणे हे अनिवार्य नाही. जर मृत्युपत्र अस्तित्वात असेल, तर त्यानुसार संपत्तीचे विभाजन होते. अन्यथा, वारसा कायद्यानुसार तिचे वाटप केले जाते.

संपत्ती हक्क आणि वारसांचे अधिकार

जर मालमत्ताधारकाने हयातीतच संपत्तीचे विभाजन केले नसेल, तर मृत्यूनंतर तिचे वाटप कसे होईल आणि कोणाला वारस म्हणून हक्क मिळेल, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात. फक्त थेट मुलगा आणि मुलगीच कायदेशीर वारस असतात का? अन्य कुटुंबीयांचा काही हक्क आहे का? हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.

हिंदू आणि मुस्लिम कायद्यातील फरक

हिंदू आणि मुस्लिम धर्मांमध्ये संपत्तीच्या वारशाचे वेगवेगळे नियम आहेत, जे कायद्याच्या चौकटीत निश्चित केले गेले आहेत.

                                 हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956

या कायद्याच्या अंतर्गत, हिंदू कुटुंबातील पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क प्रदान केला जातो. जर एखाद्या हिंदू व्यक्तीने मृत्युपत्र न करता मृत्यू झाला, तर त्याच्या संपत्तीचे वाटप कायद्याने ठरवलेल्या वारसांमध्ये केले जाते. प्रथम, संपत्ती “क्लास-1” वारसांना दिली जाते, ज्यामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी, आई आणि मुलाच्या मुलाचा समावेश होतो.

जर “क्लास-1” वारस नसेल, तर संपत्ती “क्लास-2” वारसांना दिली जाते. यामध्ये भाऊ, बहीण, नातू, पुतण्या यांचा समावेश असतो. हा कायदा हिंदू धर्मासोबतच बौद्ध, जैन आणि शीख समुदायांनाही लागू होतो.पूर्वी मुलींना वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क नव्हता. मात्र, 2005 मध्ये सुधारित कायद्यानुसार मुलींना मुलांप्रमाणेच समान वारसा हक्क प्रदान करण्यात आला.

वंशपरंपरागत संपत्ती आणि कायदेशीर बाबी

वंशपरंपरागत (वडिलोपार्जित) संपत्तीच्या बाबतीत, वडिलांना ती मनमानीरित्या वाटून देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे, मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान अधिकार प्राप्त होतो. तथापि, संपत्तीवर कोणतेही कर्ज बाकी आहे का किंवा अन्य कायदेशीर अडचणी आहेत का, हे वाटपाच्या आधी तपासणे गरजेचे आहे.

दरम्यान, संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यास, कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारक ठरते. यामुळे संपत्तीचे योग्य वाटप होण्यास मदत होते आणि कायदेशीर प्रक्रिया सुरळीत पार पडते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??