जिल्हाराजकीय

पीएमआरडीए ‘च्या कारभाराच्या आब्रूची लक्तरे काढली! विकास आराखडा हा नियम व अटी धाब्यावर बसवूनच केला गेला काय..? आमदार राहुल कुल..

पुणे :

महाविकास आघाडीच्या कारभारानंतर युती सरकारच्या कार्यकाळात पुणे शहराचा नियोजन विकास व्हावा या उद्देशाने नगरविकास विभागाने ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून तयार केलेल्या व प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याचा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी चांगलाच ‘पंचनामा ‘ केला.

आमदार राहुल कुल यांनी ताशेरे ओढताना अतिशय मनमानी पद्धतीने विकास आराखडा राबविण्याचे काम केले. निकष न पाळता विशिष्ट वर्गाला हाताशी धरुन आराखडा तयार केल्याचे लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधानसभेत उपस्थित केल्याने या प्रस्तावित विकास आराखड्यात शासन बदल करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दौंड चे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत ‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याची चिरफाड करीत हा आराखडा कसा मनमानी पध्दतीने तयार केला असल्याचे विधानसभेत पाहात वाचला. विकास आराखड्याचे खरे उद्दिष्ट, नियम व अटी, नियोजित शहराचा धर्तीवर या विकास आराखड्याचा आधार तसेच विविध सामाविष्ट क्षेत्र आराखड्यात अतिशय चुकीच्या पध्दतीने मनमानी पध्दतीने अंतर्भूत केले असल्याचे लक्षवेधी प्रश्नात निदर्शनात आणून दिले.

या विकास आराखडा संमत होण्यापूर्वी महायुती ०३ सरकारमध्ये आराखड्यात बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. असे म्हणाले..

वास्तविक पुणे ‘पीएमआरडीए’ ने विकास आराखडा तयार करताना स्थानिक मुद्दांचा विचार केला आहे का नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या विकास आराखड्याला ६९ हजार दाखल झालेल्या हरकतींनी विकास आराखड्याची खरी शकले बाहेर काढणारी आहे. ग्रामीण भागात तर या आराखड्याचा नियोजनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या भागात नागरीकांनी शेती करायची की ? शेती विकून बिल्डरांच्या घश्यात घालायची असा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या आराखड्यात सामाविष्ठ गावांचा डीपीआर करताना गावची लोकसंख्या, क्षेत्रफळ, सार्वजनिक रस्ते, भौगोलिक स्थिती नियोजनकारांनी पाहिली की नाही? हा खरा प्रश्न आहे. असे खरमरीत प्रश्न मांडला.

पूर्व हवेलीत अनेक गावांत प्रारुप आराखड्यात लोकसंख्येनुसार गावठाण न झालेली हद्दवाढ, निवासी क्षेत्राची असमतोल रचना, बागायती क्षेत्राची वर्गवारी ही विभिन्नता मोठी आहे. तर या गावांतच एकाचवेळी शेती, निवासी, औद्योगिक रचना ही मेळ न बसणारी आहे. तर काही औद्योगिक प्रयोजन असलेल्या गावांत औद्योगिक क्षेत्र न करता शेती व निवासी क्षेत्र अशी विचित्र रचना या आराखड्यात झाली आहे. तसेच हिलटॉप क्षेत्रात केलेली रचना निवासी करण्यात आल्याने विकास आराखड्याला सत्ता व अर्थिक हस्तक्षेपाचा वाव स्पष्ट जाणवत आहे. त्यामुळे हा सर्व प्रारुप विकास आराखड्यावर प्राधिकरण सदस्यांनीच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या आराखड्यावर संशय उत्पन्न होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वीच शासनाने आमदार राहुल कुल यांच्या सूचनांचा आदर ठेवीत ग्रामीण भागात नागरीकांच्या स्थानिक मिळकतींना योग्य न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

निवासी क्षेत्राचा निकष बदला..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामात बदल केले आहेत. जनतेला सकारात्मक असे निर्णय त्यांनी घेतले आहे. मात्र नगरविकास विभागाशी संलग्न असलेल्या शेती क्षेत्राचे निवासी क्षेत्रात रुपांतर करताना सामान्यांना अपेक्षित असे निर्णय व्हावे अशी नागरीकांची मागणी आहे. अशीच एक सूचना आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळात मांडली आहे. रहिवासी क्षेत्र बदलताना किमान २५ एकराचे निकष आहे. ते ५ किमान १० एकरापर्यंत करावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयाने छोटे व्यावसायिक तयार होऊन त्यांना बांधकाम क्षेत्रात काम करण्यास संधी मिळेल, या मागणीवर विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. असे म्हणाले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??