क्राईम न्युजमहाराष्ट्र

अपघात नव्हे घातपात ; वाचा सविस्तर… नाहक चार जणांचा दुर्दैवी अंत. ; हिंजवडी…

पुणे : हिंजवडीतील फेज दोन येथील कंपनी जवळ ५०० मीटर वर धावत्या बसला आग लागली. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली.

मात्र ही घटना घातपात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गाडीचा चालक जनार्दन हंबर्डीकरने पोलिसांना सगळं सांगितलं.

                          …अपघात नसून घातपात… 

बसने पेट घेतल्यानं ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या राज्यात पसरली. आधी हा अपघात असल्याचं बोललं जात होतं. पोलिसांकडून देखील शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सांगितलं जात होतं.

                       …पोलिसांनी जनार्दनचा डाव केला उध्वस्त..

पोलिसांनी त्यांची तपासाची चक्र फिरवली आणि हा घातपात असल्याचं समोर आलं. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्यासह आरटीओ चे अधिकारी यांनी धाव घेतली होती. जळालेल्या बसमध्ये नेमकं असं काय झालं की काही सेकंदामध्ये एवढी भीषण आग लागली याचा तपास सुरु झाला. याच तपासामध्ये आणि कामगारांच्या आणि जखमी असलेल्या जनार्दन हंबर्डीकरांच्या चौकशीमध्येच भलतंच काही समोर आलं.

                            …गाडीचा चालक जनार्दन कोण?… 

आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा २००६ पासून याच कंपनी मध्ये काम करतो. त्याच्याबरोबर या कंपनीमध्ये एकूण पंचेचाळीस कामगार काम करतात. ही कंपनी आधी पुण्यामध्ये कार्यरत होती. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आली आहे. याच कंपनीचे कामगार बसमधून प्रवास करत होते. त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे.

जनार्दन हंबर्डीकर याला कामगार त्रास देत होते. त्याचबरोबर दिवाळीमध्ये त्याला बोनस देखील मिळाला नव्हता. पगाराबाबतही त्याला वारंवार अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. बुधवारी ही घटना घडण्यापूर्वी मंगळवारी त्यानं प्लॅन केला. यामध्ये त्यानं अगदी याच कंपनीमध्ये स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं जे केमिकल आहे ते घेऊन कट रचला.

            …जनार्दन’ ड्रायव्हरने बस कशी पेटवली, इनसाईड स्टोरी….

पुण्यातून १४ कामगार घेऊन निघाल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हल्स हिंजवडीतील फेज वनमध्ये म्हणजे अगदी या कंपनीच्या पाचशे मीटरवर आली. कट रचल्याप्रमाणे अगदी जवळ आल्यानंतर माचीसनं सिटखालच्या केमिकल टाकलेली चिंध्या, कापडं पेटवली. त्यानं असं भासवलं की की हा अपघात आहे आणि शॉर्ट सर्किटमुळं झालेला आहे. मात्र अगदी शंभर मिटरपर्यंत पेटलेली बस पुढे जात राहिली. आरोपी आहे जनार्दन हंबर्डीकर यानं बाहेर उडी घेतली आणि त्यानंतर एक एक जण उडी मारून बाहेर पडत होते. काही जणांनी खिडकी तोडून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, चार जण आहेत पाठीमागे बसलेले असल्यानं त्यांना कळायच्या आत ते धुरामुळे गुदमरून गेले. दरवाजा उघडणं अशक्य झालं. तो दरवाजा उघडला नाही आणि त्यामुळेच त्यांचा होरपळून या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे.

                           …दिवाळीला बोनस दिला नव्हता म्हणून…

“मला दिवाळीमध्ये बोनस दिला नव्हता” असं देखील जनार्दनने पोलिसांच्या जबाबात कबूल केलेलं आहे. त्यातूनच हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. हिंजवडीमध्ये ही आयटी हब आहे. या आईटी हब मध्ये अगदी रस्त्यावर, कंपनीमध्ये अनेक सीसीटीव्ही लावलेले आहेत. या सीसीटीव्ही मध्येच वेगवेगळ्या अंगलने ही घटना कैद झाली होती.

पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की शॉर्ट सर्किट लागल्यानंतर अगदी काही वेळातच एवढी भीषण आग लागू शकत नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्यामध्ये, हा घातपात असल्याचं उघड झालेलं आहे. सध्या अ जनार्दन हंबर्डीकर याच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. खरं तर या घटनेमध्ये चार जणांचा हकनाक बळी गेलेला आहे. कारण जनार्दन हंबर्डीकर याला त्रास देणारे जे आहेत ती तीन व्यक्ती वेगळ्या आहेत. ते या घटनेत बचावलेले आहेत. दरम्यान, सहा जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??