कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सुरू…

पुणे : खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. सध्या कालव्यातून एक हजार ५४ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, हे आवर्तन सुमारे ४० ते ५० दिवस चालणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे. या पाण्याचा लाभ हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे.

यंदा समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील धरणे १०० टक्के भरली होती. त्यानंतर परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात आणखी भर पडली. त्यामुळे ग्रामीण भागातून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यापासून कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २५ टीएमसी म्हणजेच सुमारे ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कालवा समितीच्या बैठकीशिवायच निर्णय
दरवर्षी शेतीसाठी आणि शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, याचे नियोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत केले जाते. या बैठकीस शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात.

साधारणतः ही बैठक नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होते. मात्र यंदा नोव्हेंबरमध्ये नगरपालिका निवडणुकांची, तर डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने कालवा समितीची बैठक होऊ शकली नाही. परिणामी, कालवा समितीच्या निर्णयाविनाच रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??