जिल्हासामाजिक

वृक्षारोपण करणे ही एक पवित्र गोष्ट आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते ; गौरव गुप्ता

पुणे (हवेली) : श्रावण महिना हा निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. या महिन्यात भरपूर पाऊस असल्यामुळे झाडे चांगली वाढतात. श्रावण सोमवार हा भगवान शंकराचा वार असल्याने, या दिवशी वृक्षारोपण करणे शुभ मानले जाते. वृक्षारोपण करणे ही एक पवित्र गोष्ट आहे.

यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. याच समवेत हवा शुद्ध होते, मातीची धूप थांबते आणि जलचक्र व्यवस्थित चालते. झाडे वातावरणाला अधिक सुंदर बनवतात. झाडे पशू-पक्ष्यांसाठी घरटी आणि अन्न पुरवतात. वृक्षामुळे नैसर्गिकरित्या थंड हवा आणि सावली मिळते. भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळते. असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड लोणी काळभोरचे प्रबंधक गौरव गुप्ता यांनी केले.

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्याचे औचित्य साधून तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय परिसरांत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे सी ए असिस्टंट मनोज पाटील, आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाउंडेशनचे सचिव प्रतीक कोळपे, पुणे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, आभार फाउंडेशनचे अक्षय देवकर ,चेतन बोडरे, श्रीकांत झुंझुर्के, संतोष वडुडे, अजय यादव, अमोल बंधारी, राम शिंदे, नागेश भाऊ, दिलीप शेवाळे, संदीप जारे यांचे समवेत मोठ्या प्रमाणात निसर्ग प्रेमी उपस्थित होते.

यावेळी आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की वृक्षारोपण करणे ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे. श्रावण मासाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक तरी झाड लावावे, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल.

यावेळी कन्या प्रशाला व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले. वृक्षारोपण झालेनंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मुलींना छत्री वाटप करण्यात आले.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??