जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजी प्रवेश’ ॲप अनिवार्य ; ऑफलाइन प्रवेशपत्र बंद…

मुंबई : मंत्रालयातील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी फक्त ‘डीजी प्रवेश’ ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच परवानगी मिळणार आहे. ऑफलाइन पद्धतीने खिडकीवरून प्रवेशपत्र देण्याची सुविधा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली.

सध्या अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक असला तरी, दुपारी दोननंतर प्रवेशासाठीच्या खिडक्यांवर मोठी गर्दी होत होती. ग्रामीण भागातून येणाऱ्या व स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठीच खिडकीवर प्रवेशपत्राची सुविधा ठेवण्यात आली होती. मात्र, वाढत्या गर्दीमुळे आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ ऑगस्टनंतर मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी अभ्यागतांना ‘डीजी प्रवेश’ ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून, दहा अंकी मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींसाठी पर्यायी यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही निकम यांनी सांगितले.

यापूर्वी मंत्रालयात मंत्र्यांना, आमदारांना व त्यांच्या सहाय्यकांना भेटण्यासाठी लागणाऱ्या रांगांमुळे वेळेचा मोठा अपव्यय होत असे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर ही रांग भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचत असे. ‘डीजी प्रवेश’ ॲप सुरू केल्यानंतरही गर्दी कमी झाली नव्हती, त्यामुळे हा कडक निर्णय घेण्यात आला आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??