जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठा बदल ; मोबाईल नंबर आधारला लिंक करणे अनिवार्य…

मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा SMS अनेक नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचायला सुरुवात झाली आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

परिवहन विभागाने या बदलाची माहिती नागरिकांना एसएमएसद्वारे देणे सुरू केले आहे. हा निर्णय केवळ औपचारिक नसून, विविध सेवांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणामुळे (Aadhaar Authentication) युजर्सची ओळख पडताळली जाईल.

रिअल-टाइम अपडेट्स मिळणार…

मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे वाहन नोंदणी, परवाना नूतनीकरण, वाहतूक नियमभंगावर झालेला दंड अशा महत्त्वाच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळतील. यामुळे नागरिक आणि विभाग यांच्यातील संवाद सुधारेल.
याशिवाय, काही जण चुकीची माहिती देऊन दंड टाळण्याचा किंवा नियमांचे उल्लंघन करून ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आधार आधारित पडताळणीमुळे हा गैरवापर थांबेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करता येणार असून, यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा ‘वाहन’ (Vaahan) आणि ‘सारथी’ (Sarathi) पोर्टलवरून मोबाईल नंबर अपडेट करता येईल.

प्रक्रिया अशी :

अधिकृत पोर्टलवर जा.

“Update Mobile Number via Aadhaar” हा पर्याय निवडा.

वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) आणि चेसिस/इंजिन क्रमांक (Chassis/Engine Number) भरा.

आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून प्रमाणीकरण पूर्ण करा.

👉 टीप : नागरिकांनी ही प्रक्रिया करताना संबंधित विभागाकडून माहितीची पुष्टी करूनच अंतिम सबमिशन करावे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??