जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

दौंड, सहजपूरच्या तरुणाची थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी; उमेश म्हेत्रेच्या अर्जाने राजकीय वर्तुळात खळबळ

धनंजय काळे

पुणे (ता. दौंड) : देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीने विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना, तर विरोधी INDIA ब्लॉकने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण या दोन दिग्गज उमेदवारांच्या शर्यतीत आता एका तरुणाने थेट अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा उमेश म्हेत्रे (Umesh Mhetre) या तरुणाने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतील राज्यसभा सचिवालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. यासाठी आवश्यक असलेले 15,000 रुपयांचे डिपॉझिट देखील त्यांनी जमा केले.

साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या उमेश म्हेत्रे यांच्या या पावलामुळे स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे वय किमान 35 वर्ष असणे आवश्यक आहे, तसेच 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदकांचा पाठिंबा मिळणे बंधनकारक आहे. म्हेत्रे यांनी या सर्व अटी पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

या अर्जामुळे दोन राष्ट्रीय आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एक सर्वसामान्य तरुणही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. लोकशाहीवरील विश्वास आणि तरुणाईतील आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून म्हेत्रे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

निवडणूक आयोग लवकरच या अर्जाची छाननी करणार असून, तो वैध ठरल्यास उमेश म्हेत्रे 9 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीत थेट स्पर्धेत उतरतील.

सध्या म्हेत्रे यांचे नाव सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले असून, मोठ्या आघाड्यांच्या उमेदवारांसोबत एका ग्रामीण तरुणाची एंट्री उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला वेगळं वळण देणारी ठरणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??