जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

1 सप्टेंबर पासून नवे वाहतूक नियम लागू ; दंडात १० पट वाढ… सविस्तर वाचा…

नवी दिल्ली : रस्ते अपघातांवर नियंत्रण आणणे आणि वाहतूक शिस्त काटेकोरपणे पाळली जावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे नवे नियम १ मार्च २०२५ पासून संपूर्ण देशभर लागू झाले असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहा पट वाढवण्यात आली आहे.

नवे बदल आणि कारवाई…

दंड रकमेतील वाढ : वाहतूक नियम मोडल्यास आता अधिक दंड आकारला जाणार आहे.

ई-चलन प्रणाली : पोलिसांकडून ई-चलन मशीन व सीसीटीव्हीच्या साहाय्याने थेट कारवाई. चलन थेट वाहनमालकाच्या मोबाईल व ई-मेलवर.

लायसन्स निलंबन : दारू पिऊन गाडी चालवणे किंवा गंभीर उल्लंघन झाल्यास लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित.

अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई : १८ वर्षाखालील व्यक्ती गाडी चालवत असल्यास पालक/वाहनमालकास ₹२५,००० दंड आणि ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास.

महत्वाचे नियम उल्लंघन जुना दंड नवा दंड…

–हेल्मेट न घालणे जुना दंड ₹100 नवीन दंड ₹1,000 + ३ महिने लायसन्स जप्त
–सीट बेल्ट न लावणे जुना दंड ₹100 नवीन दंड ₹1,000
–सिग्नल तोडणे जुना दंड ₹500 नवीन दंड ह₹5,000
–धोकादायक वाहनचालक जुना दंड ₹500 नवीन दंड ₹5,000
–लायसन्सशिवाय वाहन जुना दंड ₹500 नवीन दंड ₹5,000
— दारू पिऊन वाहन जुना दंड ₹1,000 -₹1,500 नवीन दंड ₹10,000 + ६ महिने तुरुंगवास
–विमा नसलेले वाहन जुना दंड ₹200-₹400 नवीन दंड ₹2,000

ई-चलन भरण्याची प्रक्रिया…

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – echallan.parivahan.gov.in

2. तपशील भरा – वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक टाका.

3. ऑनलाईन पेमेंट – डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे दंड भरा.

4. पोचपावती मिळवा – भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

नागरिकांना संदेश…

सरकारने केलेले हे बदल केवळ दंड वाढवण्यासाठी नसून, रस्ते सुरक्षित ठेवणे आणि अपघातांची संख्या कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??