जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

डिझाईन सिंक परिषदेत अधिष्ठात्यांचा विद्यार्थ्यांना संदेश : “मानवी स्पर्शाशिवाय एआय अपूर्ण, विधायक वापराने अनेक संकटांना मिळू शकतो तोडगा” ; एआय संकट नव्हे, संधी! – डॉ. नचिकेत ठाकूर

पुणे : “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संकट नसून, योग्य वापर केल्यास ही मोठी संधी आहे. एआयमुळे अनेक कामे जलद गतीने होऊ शकतात आणि मानवासमोरील अनेक आव्हानांना तोडगा निघू शकतो. मात्र, एआय कितीही प्रगत झाले तरी त्याला मानवी स्पर्शाची सदैव गरज राहणार आहे,” असे मत एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले.

ते डिझाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी गुगलच्या यु-एक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोरचे डिझायनर आर्यन शर्मा, तसेच सिमरन चोप्रा उपस्थित होते.

डॉ. ठाकूर पुढे म्हणाले की, “एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही देशातील अग्रगण्य संस्था असून, यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीत डिझाईन गटात १५०-२०० क्रमांक मिळाला आहे. तसेच क्यूएस क्रमवारीतही संस्थेने आपली छाप पाडली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवतो. ‘मेराकी’, ‘कारी’ यांसारख्या राज्यस्तरीय कला महोत्सवांपासून ते एआय व डिझाईनच्या समन्वयावर चर्चा करणाऱ्या परिषदांपर्यंत आमचे प्रयत्न असतात.’’

ट्युरिंग लॅब्सचे मनोज कोठारी म्हणाले की, “आज प्रत्येक क्षेत्रात डिझाईनची गरज भासते. आमची कंपनी यु-एक्स व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असून एमआयटी एडीटी विद्यापीठासोबत सामंजस्य करारही आहे. डिझाईन ही कल्पकतेतून जन्माला येते. त्यामुळे जोपर्यंत डिझायनर सर्जनशील आहे, तोपर्यंत त्याच्या कलेला मरण नाही.”

यावेळी केतकी आगाशे, आर्यन शर्मा आणि सिमरन चोप्रा यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपले अनुभव मांडले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??