आरोग्यजिल्हासामाजिक

अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गणेश मंडळांना प्रसाद स्वच्छतेचे काटेकोर आदेश ; गणेश मंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक…वाचा सविस्तर…

पुणे : अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमण २०११ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटप करताना काटेकोर स्वच्छता पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन सु. ग. अन्नपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना दिला जाणारा प्रसाद काचेच्या भांड्यात किंवा पारदर्शक फूड ग्रेड प्लॅस्टिकच्या डब्यात झाकून ठेवावा. प्रसाद शिळा नसावा, तो हाताळणाऱ्या व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत तसेच त्यांनी हात साबणाने धुतलेले असावेत. नाक, कान, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, तंबाखू सेवन किंवा धूम्रपान करणे कडक मनाई आहे. संसर्गजन्य आजार असणाऱ्यांना प्रसाद तयार करणे वा वाटप करण्यास परवानगी नाही.

प्रसाद बनविणाऱ्यांनी नखे स्वच्छ कापलेली असावीत, हातमोजे, ऍप्रॉन, केस झाकणारी टोपी व चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थांपासून तयार प्रसाद ताजा असावा व शिल्लक प्रसाद योग्य तपमानास साठवला जावा. प्रसादासाठी वापरली जाणारी भांडी स्वच्छ धुवून व कोरडी करूनच वापरावीत. पिण्याचे पाणी उकळून व निर्जंतुक करूनच भाविकांना द्यावे.

मंडळांनी कचरा व्यवस्थापनासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवणे बंधनकारक आहे. कच्चे अन्नपदार्थ फक्त परवानाधारक दुकानातून खरेदी करावेत व खरेदीची बिले जपून ठेवावीत.

महत्त्वाचे म्हणजे, प्रसाद स्वतः तयार करून वाटप करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी मंडळांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये फी भरून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??