देश विदेशराजकीय

बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता? ; भाजप आघाडीवर, महाआघाडी पिछाडीवर – सर्व्हेचा दावा

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या मतदानानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून, त्याआधीच एक महत्त्वाचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, एनडीए आघाडी पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जेवीसी ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार,
एनडीएला १२० ते १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला ९३ ते ११२ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
भाजपाला ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८, एलजेपीला ५ ते ७, हमला २, आणि आरएलएमला २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महाआघाडीत आरजेडीला ६९ ते ७८, काँग्रेसला ९ ते १७, आणि सीपीआय (एमएल) ला १२ ते १४ जागा मिळू शकतात.

तसेच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला सर्व्हेत केवळ एकाच जागेवर विजय मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एआयएमआयएम, बसपा आणि इतर लहान पक्षांना एकत्रितपणे ८ ते १० जागा मिळू शकतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.

मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत,
एनडीएला ४१-४३%,
महाआघाडीला ३९-४१%,
तर जनसुराजला ६-७% मते मिळू शकतात,
असं या सर्व्हेत नमूद आहे.

बिहार विधानसभेतील एकूण २४३ जागांपैकी बहुमताचा आकडा १२२ आहे.
मागील निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते. तेव्हा आरजेडीने ७५, भाजपाने ७४, जेडीयूने ४३, काँग्रेसने १९, एलजेपीने १, आणि इतरांनी ३१ जागा जिंकल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत मात्र जनसुराज पक्षाच्या एंट्रीमुळे तिरंगी लढत रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे. बिहारच्या राजकारणात कोण बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??