शिक्षणसामाजिक

राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व घडविण्याचे उत्तम व्यासपीठ ; डॉ. नितीन घोरपडे…

पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) नवीन स्वयंसेवकांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना NSS चे महत्त्व, उद्दिष्टे आणि सामाजिक कार्याची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी “आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि उत्तम माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना” असे मत व्यक्त केले. त्यांनी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत अशा समाजोपयोगी उपक्रमांमधील NSS स्वयंसेवकांचा सहभाग अधोरेखित केला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत होते, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा समन्वयक व NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता कुलकर्णी यांनी Not Me, But You या NSS च्या ब्रीदवाक्याचे महत्त्व स्पष्ट केले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी NSS कशी मदत करते, यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, हेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्राचार्य म्हणून डॉ. नितीन घोरपडे यांच्या १७ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त NSS विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

उद्बोधन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. हृषीकेश मोरे, डॉ. शैला धोत्रे, प्रा. सविता भुजबळ, डॉ. वंदना सोनवले, प्रा. शीतल गायकवाड, प्रा. अर्चना श्रीचीप्पा, प्रा. महेश्वरी जाधव, प्रा. कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वंदना सोनवले यांनी केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??