जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जरांगे म्हणतात ‘विजय’ ; विनोद पाटलांचे ‘निरर्थक निर्णय’ म्हणत सरकारवर टीकास्त्र…

सरकारच्या जीआरवरून मराठा समाजात दोन मतप्रवाह ; ओबीसी संघटना आक्रमक...

पुणे : महाराष्ट्र सरकारने नुकताच मराठा आरक्षणाचा जीआर काढला. या जीआरनंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले आणि आंदोलकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. मात्र या निर्णयावरून राज्यातील राजकारणात वादंग पेटले असून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत.

विनोद पाटलांचा सरकारवर निशाणा…

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली. “हा निर्णय नसून केवळ माहिती पुस्तिका आहे. याचा मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवरही त्यांनी निशाणा साधला. “सरकारनं काढलेल्या जीआरचा नेमका फायदा काय होणार आहे हे विखे पाटलांनी स्पष्ट करावं,” असा टोला त्यांनी लगावला.

मनोज जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर…

विनोद पाटलांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी “हा जीआर मराठा समाजासाठी महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे आंदोलन यशस्वी झाले,” असे सांगत उपोषण मागे घेतले.

ओबीसी संघटना आक्रमक…

दुसरीकडे, या जीआरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “मनोज जरांगे यांच्या हट्टाखातर सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करत हा जीआर काढला. हा जीआर म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं ‘डेथ वॉरंट’ आहे,” असा इशारा ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी दिला. “हा बेकायदेशीर जीआर कोर्टात आव्हान देऊन रद्द होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असेही ते म्हणाले.

दोन मतप्रवाह…

जीआरवरून मराठा समाजातही मतभेद उघडकीस आले आहेत. जरांगे पाटलांच्या मते हा निर्णय विजय आहे, तर विनोद पाटलांच्या मते तो निरर्थक आहे. त्यामुळे समाजात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत.

सुप्रिया सुळेंची टीका…

या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली. “केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचंच आहे. २५० खासदार तुमचे आहेत. तरीही मराठा आरक्षण का मिळत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहोत, पण राज्य सरकार या विषयात असंवेदनशील आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करावी आणि सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यात त्यांच्या शिष्टमंडळालाही सहभागी करून घ्यावं,” अशी मागणी सुळेंनी केली.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??