जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 334 पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचाही समावेश…

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी मोठा निर्णय घेत देशातील तब्बल 334 नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा समावेश आहे. या निर्णयानंतर देशभरात आता केवळ 6 राष्ट्रीय पक्ष आणि 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत.

नोंदणी रद्द करण्यामागील कारणे

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, संबंधित पक्षांनी 2019 पासून कोणत्याही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नाही.

आयोगाच्या तपासात अनेक पक्षांची कार्यालये बंद किंवा अनुपलब्ध आढळली.

आवश्यक कागदपत्रे, खाते तपशील आणि अद्ययावत माहिती वेळोवेळी न दिल्याने नोंदणीसाठी आवश्यक अटींचा भंग झाला.

आयोगाच्या मते, हे पाऊल सक्रिय नसलेल्या व केवळ नावापुरते अस्तित्व असलेल्या पक्षांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक होते.

महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झालेल्या 9 पक्षांची यादी

1. आवामी विकास पार्टी

2. बहुजन रयत पार्टी

3. भारतीय संग्राम परिषद

4. इंडियन मिलान पार्टी ऑफ इंडिया

5. नवभारत डेमॉक्रेटिक पार्टी

6. नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी

7. पीपल्स गार्डीयन

8. द लोक पार्टी ऑफ इंडिया

9. युवा शक्ती संघटना

देशातील उरलेले प्रमुख पक्ष

निवडणूक आयोगाच्या नोंदीप्रमाणे, देशात सध्या केवळ 6 राष्ट्रीय पक्ष मान्यताप्राप्त आहेत 

भारतीय जनता पार्टी (भाजपा)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बहुजन समाज पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरद पवार,
सीपीएम आणि आम आदमी पार्टी.
तसेच 67 प्रादेशिक पक्ष मान्यताप्राप्त आहेत.

आयोगाचे विधान…

आयोगाने म्हटले आहे की, ही कारवाई निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांमधील स्पष्टता आणि गैरवापर टाळण्यासाठी करण्यात आली आहे. “राजकीय पक्ष हा केवळ कागदावर राहू नये, तर तो सक्रियपणे लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणारा असावा”, असेही आयोगाने स्पष्ट केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??