जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेली विद्यार्थीनी अकाली हरपली…

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील पाळू गावातील शेतकरी कुटुंबातून पुढे येत स्पर्धा परीक्षेत राज्यभर नावलौकिक मिळवलेली अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिचे दुर्दैवी निधन झाले. २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिने उल्लेखनीय यश मिळवले होते.

मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर सुरू असलेल्या तिच्या मृत्यूशी झुंजीचा शेवट अखेर झाला.

२८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासानंतर अंघोळीसाठी पाणी तापवताना हिटरचा धक्का बसला आणि उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली. तत्काळ उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, उपचारादरम्यान अखेर तिचा मृत्यू झाला.

अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत खेड तालुक्यात मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी उदारतेने मदतही केली. तरीसुद्धा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रयत्नांनंतरही तिचा जीव वाचवता आला नाही.

जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून ती सातत्याने प्रयत्नशील होती. पण अकाली निधनामुळे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. अश्विनीच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका, विद्यार्थी वर्ग आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??