जिल्हाराजकीयसामाजिक

लोणी काळभोर ग्रामपंचायतीकडून ‘सरपंच आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (पुणे) : गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या हेतूने लोणी काळभोर ग्रामपंचायतीकडून ‘सरपंच आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामसेवक एस. एन. गवारी, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर आणि माजी सदस्य पांडुरंग केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर म्हणाले, “गावातील प्रत्येक कुटुंबाची अडचण, सूचना आणि गरजा यांचे लिखित स्वरूपात संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत घराघरात पत्रके वाटली जातील. कुटुंबाने आपापल्या समस्या त्या पत्रकांवर नमूद करून, वॉर्डनिहाय नेमून दिलेल्या दिवशी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करायच्या आहेत.”

या माहितीच्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘सरपंच आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य थेट गावकऱ्यांच्या भेटीला जाणार असून, त्यांचे प्रश्न आणि सूचना ऐकून घेणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे समस्या तात्काळ मार्गी लागण्यास मदत होईल.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांशी संवाद अधिक दृढ होणार असून, ग्रामपंचायत प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि संवेदनशील होईल, असा विश्वास सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी व्यक्त केला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??