जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पक्ष सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही! उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका; पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर कडक आदेश…

मुंबई, (दि.२०) : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपली ठाम व रोखठोक भूमिका मांडली.

“निष्ठावंतांनाच उमेदवारी; परतणाऱ्यांना नाही संधी”

बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. मात्र, जो पडत्या काळात निष्ठेने पक्षासोबत उभा राहिला, त्याला शंभर टक्के साथ मिळेल.” त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून परत आलेल्या बंडखोरांसाठी दार कायमचे बंद झाल्याचा संदेश गेला आहे.

मनसेसोबतच्या युतीवर चर्चा…

महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि मनसे युती होणार का, याबाबत चर्चेला उधाण आले होते. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मनसेसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच युतीबाबत निर्णय घेतला जाईल.” यामुळे मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पदाधिकाऱ्यांना कडक आदेश…

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले की हवेदावे विसरून निवडणूक तयारीला लागा.‌ स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. मतदानाच्या दिवशी दुबार मतदान होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घ्या. एका जागेसाठी अनेक इच्छुक असतील तरी मत्सर न करता पक्षाच्या झेंड्यासाठी लढा.

त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या उमेदवाराला वैयक्तिक मत्सरापेक्षा पक्षाची ताकद महत्वाची आहे. उमेदवारी कुणालाही मिळो, सर्वांनी एकदिलाने लढा दिला पाहिजे.”

कंबर कसलेल्या निवडणुका…

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली येथील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. येत्या निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली असून, सर्व निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावरच सत्ता मिळवायची ठरवल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

मुंबईचे माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्याचे स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या आदेशांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली असून, शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??