जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्यात होणार २० नवीन जिल्हे आणि ८१ तालुके?; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती…

पुणे : महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. राज्यात तब्बल २० नवे जिल्हे आणि ८१ नवे तालुके करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर येथे दिली.

बावनकुळे म्हणाले, “सरकारसमोर नवीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु जोपर्यंत २०२१ ची जनगणना पूर्ण होत नाही आणि तिचा अहवाल येत नाही, तोपर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय घेता येणार नाही.”

जिल्हा निर्मितीची चर्चा कायम…

राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र २०२३ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला होता. प्रत्येक नवीन जिल्हा तयार करण्यासाठी किमान ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने, तसेच मुख्यालयाच्या ठिकाणावरून होणारे राजकीय वाद यामुळे ही प्रक्रिया थांबली होती.

तथापि, नवीन तालुके निर्माण करण्याबाबत सरकार सकारात्मक राहिले आहे. प्रशासन सुलभ करण्यासाठी व स्थानिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हे व तालुके वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

जनगणना अहवालानंतरच निर्णय…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा निर्मितीबाबतचा निर्णय घेण्यासाठी जनगणनेचा अहवाल अनिवार्य आहे. अहवाल आल्यानंतर भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्या यांचा सविस्तर अभ्यास करूनच जिल्ह्यांची निर्मिती करता येईल.

व्हायरल मेसेज खोटे ठरले…

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येईल, विकासाला गती मिळेल असा दावा केला जातो, मात्र या प्रक्रियेसोबत मोठा आर्थिक भार व प्रशासकीय अडचणीही आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??