जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महाराष्ट्र हादरलं! मुसळधार पावसानंतर आता पूराचं संकट, शासनानं जारी केले हेल्पलाइन नंबर

हवामान खात्याचा इशारा : मुसळधार पावसासह राज्यात पूरस्थितीची शक्यता, आपत्कालीन क्रमांक जाहीर...

मुंबई : राज्याला पावसानं झोडपून काढलं असून अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. हवामान विभागानं पुढील २४ तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ४८ तास राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू राहणार आहे.

आज हवामान विभागानं मुंबई, ठाणे, जालना, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विशेष दक्षता घेत १७ जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

१७ जिल्ह्यांचे आपत्कालीन क्रमांक :

बीड – 02442-299299
लातूर – 02382-220204
धाराशिव – 02472-227301
नांदेड – 02462-235077
परभणी – 02452-226400
सोलापूर – 0217-2731012
पुणे – 09370960061
सातारा – 02162-232349
अहमदनगर – 0241-2323844
गडचिरोली – 07132-222031
कोल्हापूर – 02312-659232
रायगड – 08275152363
रत्नागिरी – 0705722233
सिंधुदुर्ग – 02362-228847
पालघर – 02525-297474
ठाणे – 09372338827
मुंबई शहर व उपनगर – 1916 / 022-69403344

मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक :
022-22027990, 022-22794229, 022-22023039, 09321587143

नागरिकांना आवाहन…

शासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, पूरस्थिती टाळण्यासाठी अति आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. पावसामुळे आधीच हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??