जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे निवेदन ; कठोर कायदेशीर कारवाईची मागणी…

छत्रपती संभाजीनगर, : (७ ऑक्टोबर २०२५) भारताचे ५२वे सरन्यायाधीश मा. भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हल्ल्याचा प्रयत्न झाला. राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्याकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला, तसेच जातीय द्वेषातून हा हल्ला केला गेला.

यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने राष्ट्रपतींना विभागीय उपआयुक्तांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, हा न्यायालयीन अवमान असून १९७१ च्या कायद्याअंतर्गत न्यायाधीशांवर हल्ला करणे, गोंधळ निर्माण करणे किंवा न्यायालयीन कार्यवाहीत अडथळा आणणे हे गुन्हेगारी अवमान मानले जाते.

पक्षाचे निवेदन असे सांगते की, “लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्यायव्यवस्थेकडे न्याय मिळतो. या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तीवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायव्यवस्थेचा नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.”

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर देशाच्या सरन्यायाधीशांवर असे कृत्य घडत असेल, तर सामान्य नागरिक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त किंवा इतर सरकारी अधिकारी यांच्यासोबत अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी, कायद्यात कठोर तरतुदी करून असे कृत्य करणाऱ्यांचे राष्ट्रीयत्वही रद्द करण्याची मागणी निवेदनात केली गेली आहे. निवेदनात असेही नमूद केले आहे की, यापुढे कोणालाही अशा प्रकारचे धाडस करण्याचे साहस होणार नाही.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख लोकनेते राजुभाई साबळे, जिल्हा अध्यक्ष दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, तसेच प्रकाश घोरपडे, प्रदीप धनेधर, अनिस गंगापूरकर, शाहीर अशोक शिरसाठ आदी उपस्थित होते.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??