जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मतदार यादी स्वच्छ करा नाहीतर निवडणुका घेऊन दाखवा ; राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला थेट इशारा…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील गंभीर गोंधळावरून निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे.

“जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा,” असं खुले आव्हान त्यांनी दिलं.

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली.

ते म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा सांगत आहेत की मतदार याद्यांमध्ये बोगस नावे भरली गेली आहेत. मग या निवडणुका नेमक्या कोणासाठी होत आहेत? गेली १०-१५ वर्षं हेच घोळ सुरू आहेत. उन्हात उभं राहून मतदान करणाऱ्या नागरिकांच्या मताला किंमत नसेल, तर निवडणुका कशासाठी?”

राज ठाकरेंनी अडाणी-अंबानी समूहांवर आणि सत्ताधाऱ्यांवरही थेट आरोप केले. ते म्हणाले, “राज्यातील शहरं अडाणी-अंबानींना देण्यासाठी हे सर्व डावपेच रचले जात आहेत. वीज, रस्ते, टनेल — सगळीकडे त्यांचाच हस्तक्षेप आहे. हे सगळं उद्योगपतींसाठी चाललेलं आहे, जनतेसाठी नाही. मराठी माणसं त्यांच्यासाठी दलाल बनली आहेत, आणि केंद्र-राज्य दोन्ही त्यांच्या हातात आहेत. आता पालिका आणि जिल्हा परिषदाही त्यांच्या ताब्यात द्यायच्या आहेत. हे सगळं एक नियोजनबद्ध खेळ आहे.”

राज ठाकरेंनी मुंबईवरूनही गंभीर विधान केलं.
“गुजरातला मुंबई हवी होती, हे आजचं नाही तर जुनं षडयंत्र आहे. वल्लभभाई पटेल यांनीही मुंबई गुजरातला देण्याची भूमिका घेतली होती. आज पुन्हा तसंच होत आहे — महाराष्ट्राचं अस्तित्व जमीन गमावण्यात आहे,” असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “सर्वांना विनंती आहे की सतर्क राहा. एका एका घरात शेकडो बोगस मतदार भरले जात आहेत. सर्व यादी प्रमुखांनी घराघरात जाऊन तपासणी करावी. जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. नाहीतर निवडणुका घेऊनच दाखवा!”

राज ठाकरेंच्या या तीव्र वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मनसेने घेतलेली ही आक्रमक भूमिका राजकारणात नवी चर्चा पेटवणारी ठरत आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??