जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! ‘त्या’ संस्थांसाठी नोंदणी अनिवार्य ; एसओपीसह कडक कारवाईची तयारी…

मुंबई : आपल्या कडक आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अपंग कल्याण विभागाचे सचिवपद स्वीकारताच पुन्हा एकदा धडाकेबाज पाऊल उचलले आहे. राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, एसओपी (मानक कार्यप्रणाली) सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) कायदा 2016 च्या तरतुदीनुसार, आता कोणतीही व्यक्ती, संघटना किंवा संस्था वैध नोंदणीशिवाय दिव्यांग क्षेत्रात कार्य करू शकणार नाही. अशा संस्था सोसायटी नोंदणी कायदा, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा किंवा कंपनी कायदा कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

अर्ज व कार्यपद्धती…

संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा. हा अर्ज पाच दिवसांत अपंगत्व कल्याण आयुक्तांकडे पाठवला जाईल. चौकशी प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण होईल, तर जिल्हास्तरीय समिती संस्थेची प्रत्यक्ष तपासणी करून ३० दिवसांत अहवाल सादर करेल. त्यानंतर आयुक्तांकडून संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असेल.

नूतनीकरण आणि तपासणी :

नोंदणी संपण्यापूर्वी ६० दिवस अगोदर नूतनीकरणाचा अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रत्येक संस्थेची वर्षातून एकदा तपासणी केली जाणार आहे. तसेच संस्थांनी आपला वार्षिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

नियमभंग झाला तर थेट रद्द!
सरकारी नियमांचे उल्लंघन,

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे, निधीचा गैरवापर, लाभार्थ्यांना योग्य लाभ न देणे, आर्थिक अनियमितता किंवा शोषणाचे प्रकार आढळल्यास संबंधित संस्थांची नोंदणी थेट रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुंढेंनी दिला आहे.

राज्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरेल, अशी चर्चा प्रशासन व सामाजिक क्षेत्रात सुरू आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??