जिल्हासामाजिक

खराडीतील नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन १९० व्या दिवशी कायम : बोगस एस.आर.ए. रद्द व मालकीहक्कासाठी लढा तीव्र…

पुणे : खराडी परिसरातील नागरिकांचा बोगस एस.आर.ए. प्रकल्प रद्द करावा, मोकळ्या जागेसह नव्याने लेआउट तयार करून मागासवर्गीय कुटुंबांना मालकीहक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आज १९०व्या दिवशीही सुरूच आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, नागरिकांनी शांततामय पद्धतीने आपला हक्काचा लढा सुरू ठेवला आहे. नागरिकांची मागणी आहे की, अस्तित्वात असलेल्या वसाहतींचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांच्या मूळ जागेवरच करण्यात यावे तसेच जळीतग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी.

तसेच या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा म्हणून मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून या वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना विकासाच्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथाकथित एस.आर.ए. प्रकल्पांतर्गत काही बोगस विकासकांना लाभ मिळावा म्हणून गरीब, मागासवर्गीय आणि श्रमिक वर्गाचे नुकसान केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

आंदोलन समितीचे मार्गदर्शक राजेंद्र साळवे यांनी सांगितले की, “हे आंदोलन आमच्या अस्तित्वासाठी आणि जगण्याच्या हक्कासाठी आहे. शासन व स्थानिक प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

नागरिकांना दररोज या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, दररोज सकाळी ११ ते १२ या वेळेत सर्व वसाहतीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळे आणि युवक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??