जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धडा : प्रेमसंबंध तुटले म्हणून बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही…

नवी दिल्ली : परस्पर संमतीने जुळलेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला, म्हणून पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २४) दिला. जस्टिस बी. व्ही. नागरत्ना आणि जस्टिस आर. महादेवन यांच्या खंडपीठाने संबंधित आरोपीविरुद्ध दाखल प्रकरण थेट रद्द करत स्पष्ट निर्देश दिले.

न्यायालयाने नमूद केले की, विवाहाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस, विश्वसनीय आणि प्राथमिक पुरावे आवश्यक आहेत. केवळ नात्यात मतभेद झाले, निराशा निर्माण झाली किंवा संबंध पुढे न वाढल्याने विवाह झाला नाही, म्हणून गुन्हा ठरू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की… 

—सुरुवातीपासूनच आरोपीने खोटे बोलल्याचे पुरावे असणे गरजेचे
—पीडितेची संमती ही फसव्या आश्वासनामुळेच दिली गेली असल्याचे स्पष्ट असणे आवश्यक
—“परस्पर संमतीने झालेले लैंगिक संबंध आणि बलात्कार यामध्ये स्पष्ट व ठोस रेषा आहे,” असे कोर्टाचे निरीक्षण

हायकोर्टाचा निर्णय बाद…

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने एका वकिलाविरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता. विवाहित महिलेशी झालेल्या जवळीक, तीन वर्षांचे नाते, परस्पर संमतीने झालेले संबंध आणि नंतर विवाहाचा नकार यावरून महिला पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र केसचा तपशील तपासून हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.

न्यायालयाने नमूद केले की… 

—नातं तीन वर्षे टिकले, तक्रार उशिरा करण्यात आली
—जबरदस्ती, फसवणूक किंवा अचानक त्यागाचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत
—“फक्त विवाह झाले नाही म्हणून गुन्हा ठरू शकत नाही,” असा स्पष्ट निर्वाळा

या निर्णयामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांच्या कायदेशीर व्याख्येला नवीन दिशा मिळाल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??