जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

बेकायदेशीर निवडणुका घेतल्या तर रद्द करू! सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला सज्जड इशारा; शुक्रवारी अंतरिम आदेश…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज कठोर भूमिका घेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. “बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याचे आढळले, तर आम्ही त्या रद्द करू. कायद्याला धरून नसलेले सर्व निर्णय बाद केले जातील,” अशी तिखट टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली. न्यायालय शुक्रवारी अंतरिम आदेश देणार असून राज्यातील 57 संस्थांच्या निवडणुका धोक्यात आल्या आहेत.

सन 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. राज्य सरकारने आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ठरवली. “निवडणुका कायदेशीर चौकटीबाहेर गेल्या, तर न्यायालय हस्तक्षेप करेल,” असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे सादर केलेल्या भूमिकेत, “50 टक्के मर्यादेबाहेर गेलेल्या आरक्षणावर निवडणूक आयोगाशी सल्लामसलत सुरू असून भूमिका निश्चित करण्यास वेळ द्या,” अशी विनंती केली. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी “2 डिसेंबरला होणाऱ्या 242 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींच्या मतदानापैकी 57 ठिकाणी एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे,” अशी माहिती दिली. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारपर्यंत जाहीर केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. विकास सिंग यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. तर अॅड. इंदिरा जयसिंग यांनी “निवडणुका थांबवू नयेत, सविस्तर सुनावणी व्हावी,” असा विरोध दर्शवला. आदिवासीबहुल भागात आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांनी न्यायालयासमोर मांडले.

सुप्रीम कोर्टाने निरीक्षण केले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांवर अनेक वर्षांपासून प्रशासक बसले आहेत. निवडणुका लांबणीवर न टाकता अडचणी दूर करून पुढे जाणे आवश्यक आहे. समाजाला जातीच्या आधारावर विभागता येणार नाही. ओबीसींना वगळून लोकशाही असू शकत नाही.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “2 डिसेंबरची नगरपरिषद निवडणूक नियोजितप्रमाणे पार पडेल, अंतिम निर्णय न्यायालयाचाच असेल.”

शुक्रवारी न्यायालय कोणते अंतरिम आदेश देते, याकडे राज्य सरकार, निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??