जिल्हाराजकीय

ग्रामसभेचा निर्णयाविनाच गाशा गुंडाळण्यात आला. यामध्ये १ नंबर वार्ड पाण्याविणा किती दिवस वंचित राहणार ग्रामस्थांचा सवाल? ; कदमवाकवस्ती..

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व फुरसुंगी या दरम्यानच्या शिवरस्त्याचा वाद कदमवाकवस्तीच्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच गाजला.

       कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी माळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.२५) सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता. ही ग्रामसभा उपसरपंच व सभेचे अध्यक्ष नासीरखान पठाण व ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी माजी सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बिना काळभोर, रूपाली काळभोर, अभिजीत बडदे, मंदाकिनी नामूगडे, अशोक शिंदे, दीपक आढाळे, सुशील महाराज काळभोर, मुकुल काळभोर, प्रीतम काळभोर, नितीन टिळेकर, विशाल गुजर, ऍडव्होकेट राहुल झेंडे, अविनाश बडदे, गौरव काळभोर, प्रतीक काळभोर, नितीन लोखंडे, पोलीस पाटील प्रियंका भिसे, उपस्थित होते.

       नवपरिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड

        कदमवाकवस्ती गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरीकरणाचा वेग हा प्रचंड आहे. नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच गावातील आपला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करुन खत निर्माण करण्यात येईल व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. कचर्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा कचरा प्रत्येक घरातून संकलीत करताना प्रत्येक घरातून एनजीओ/संस्थेमार्फत कचरा गोळा करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक घरासाठी किमान प्रतिमाह ५० ते ६० रुपये संस्थेला द्यावे लागतील. कचरा इतरत्र टाकणाऱ्या नागरिकांवर विद्रुपकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच गावाच्या नकाशात पडलेले सर्व पीएमआरडीचे रस्ते खुले करण्यात यावेत. शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये मदत कक्ष उभारण्यात यावा, कदमवाकवस्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा रस्ता व शिवरस्ता व्हावा, अशा विविध मागण्या यावेळी नवपरिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड ग्रामसभेत मांडल्या.

        जवळपास असणाऱ्या पीएमआरडीए व शिवरस्त्याच्या मागणीवर बोलताना माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर व गौरव काळभोर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतातून अगोदरच १०० फुटाचा डीपी रोड गेला आहे. त्यानंतर १०० फुटावरूनच जर शिव रस्ता जाणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. दोन्ही रस्त्या ऐवजी एक रस्त्याला आमचा विरोध नाही. त्यामुळे डीपी रोडचा प्रस्ताव रद्द करा त्याला आमचा सर्वानुमते पाठींबा आहे, असे यावेळी सांगितले. तसेच पाण्याची पाईपलाईन कवडी माळवाडी ते ग्रामपंचायतीला कोठून आणणार? पुणे- सोलापूर महामार्गावरून का आणणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला.

      अखेर सभेमध्ये सत्ताधारी व विरोध यांचे शिष्टमंडळ करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येईल असे ग्रामसेवक अमोव घोळवे यांनी सांगितले.

     ग्रामसभेत रस्ता व पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाइनचा कुठल्याही निर्णय झाला नाही. अखेर ग्रामसभेचा निर्णयाविनाच गाशा गुंडाळण्यात आला. यामध्ये १ नंबर वार्ड पाण्याविणा किती दिवस वंचित राहणार हे आत्ता तरी सांगता येणे कठीण असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा होती.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

“द पाॅईंट न्युज 24” – https://vedhjanshakticha.in/

फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com

डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??