महाराष्ट्रशिक्षण

शैक्षणिक – नवीन प्रवेशापूर्वी ४ कागदपत्रं नक्की तपासून घ्या, पालकांनो सावधान! पुण्यात ५१ तर राज्यभरात तब्बल ८०० शाळा बोगस…

मुंबई : पालकांनो सावधान आपला मुलगा, मुलगी अनधिकृत शाळेत शिकत तर नाहीत ना ? सध्या राज्यात अनधिकृत शाळांच्या प्रकरणांनी पालकांमध्ये चिंता वाढली जाणार यात शंका नाही.

शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत राज्यात तब्बल ८०० शाळा बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, यातील १०० शाळांना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातच ५१ शाळा बोगस असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या मान्यतेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुणे जिल्ह्यात बोगस शाळांची संख्या प्रत्यक्षात १०० च्या आसपास असू शकते. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास पालकांची आर्थिक फसवणूक होते आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. शिक्षण विभाग वेळोवेळी अशा अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करत असतो, परंतु पालकांनीही सावध राहून योग्य शाळेची निवड करणे महत्त्वाचे ठरते.

                           ‘या’ जिल्ह्यांत कारवाई…

शालेय शिक्षण आयुक्तांनी अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले असून, त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे इतर मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ही कारवाई विशेषतः सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा तपशील पाहता, जिल्हा कार्यक्षेत्रात ८ अनधिकृत शाळा, ५ अनधिकृत इरादापत्र प्राप्त शाळा आणि १५ अनधिकृत स्थलांतरित शाळा आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात ९ अनधिकृत शाळा, ५ इरादापत्र मिळालेल्या शाळा आणि ९ स्थलांतरित शाळा आहेत.

                             ‘ही’ कागदपत्रं नक्की तपासा…

मुलाला शाळेत प्रवेश देण्याआधी पालकांनी ना-हरकत प्रमाणपत्र, मंडळाचे मान्यता पत्र व शासनाचे इरादापत्र या कागदपत्रांची चौकशी करणे गरजेचे आहे. जसे आपण घर खरेदी करताना सर्व कागदपत्रांची शहानिशा करतो, तशीच दक्षता मुलाच्या शिक्षणासाठी घेतली गेली पाहिजे.

शाळा मान्यताप्राप्त आहे की नाही, हे पाहण्यासाठी यू-डायस पोर्टलवर जाऊन शाळेचा नोंदणी क्रमांक तपासता येतो. ही सोपी प्रक्रिया पालकांच्या मनातील शंका दूर करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकते.

राज्यभरातील एकूण १३०० शाळांची तपासणी करण्यात आली असून, ८०० शाळांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यापैकी १०० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पालकांनी अशा शाळांची माहिती मिळाल्यास शिक्षण विभागाकडे तक्रार करून योग्य कारवाईसाठी पुढाकार घ्यावा. व बोगस शाळांचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी शासनास पालकांनी मदत करावी.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??