कृषी व्यापार

ई हक्क प्रणालीचा वापर, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, ; तलाठी कार्यालयात आर्थिक पिळवणूकीला आळा बसणार का?

तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणं बंद,घरबसल्या करा वारसा नोंद; सविस्तर पाहा..

मुंबई : राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला आहे. वारसा नोंद आणि इतर कार्यालय कामकाज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या स्थितीला बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासाठी आणि इतर महसूल कामासाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असतात.

या कामांसाठी तलाठी कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांचे कामे हे वेळेत होत नाहीत. नोंदी करण्यासाठी सातत्याने तलाठी कार्यालयात जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एका तलाठीकडे दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची प्रचंड हेंडसाळ होताना दिसून येते. त्याच बरोबर नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत असते. छोट्या मोठ्या कामांसाठी कमिशन द्यावे लागते. या सर्व गोष्टींवर आळा बसण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

                ई हक्क प्रणालीचा वापर केला जाणार

राज्य सरकारने महसूल विभागाच्या कामासाठी ई हक्क प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्याचा वापर करून नागरिक हे बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासह अन्य कामांसाठी ई हक्क प्रणालीचा वापर करता येणार आहे.

                          नोंद कुठे करायची?

दरम्यान हे सर्व कामे करण्यासाठी महसूल विभागाच्या pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. ही वेबसाइट शासनाची अधिकृत वेबसाइट आहे. याचा वापर नागरिक करू शकणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??