जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय ; भाजपचे खासदार निशिकांत दुबेनी राहुल गांधींवर साधला निशाणा…

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 152 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत पहिल्याच फेरीत बहुमत मिळवलं.

या निकालानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधकांना चिमटे काढले. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, “इंडिया आघाडीला 300 मते मिळाली, पण तुमचे 15 खासदार आमच्या उमेदवाराला मतदान करून पळून गेले. राहुल गांधीजी, तुमची एकता संपली का?” असं विचारत त्यांनी राहुल गांधींवर टोलाही लगावला.

यावेळी त्यांनी नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाल्याचं नमूद करत, “विरोधकांची 15 मते एनडीएकडे गेली, तर आणखी 15 मते वाया गेली. उपराष्ट्रपती मतपत्रिकेने निवडले जातात, ईव्हीएमने नाही,” अशीही टीका केली.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र इंडिया आघाडीचे 100 टक्के खासदारांनी मतदान केल्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे लोकसभा व राज्यसभेतील मिळून 315 खासदारांचे संख्याबळ होते. मात्र रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाल्याने, विरोधकांच्या 15 मतांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या वेळेस दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना पाहायला मिळाला. मतमोजणीमध्ये राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना 300 मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेला 377 मतांचा कोटा राधाकृष्णन यांनी सहज पार केला.

एकूण 781 खासदारांपैकी 767 जणांनी मतदान केलं होतं. बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि शिरोमणी अकाली दलाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 752 मते वैध ठरली, तर 15 मते अपात्र ठरली.

या विजयासह एनडीएने उपराष्ट्रपती पदाची बाजी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??