जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात ; मराठा आरक्षणावरून वाद चिघळला…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापलं आहे. आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करून सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. या निर्णयामुळे मराठा समाजात समाधानाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या मुद्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

✦ संभाजीनगर खंडपीठाचा दाखला…

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय कायद्याला धरून नाही. मराठा आणि ओबीसी यांचे ताट वेगळे असले पाहिजे. संभाजीनगर खंडपीठाच्या निकालात स्पष्ट म्हटलं होतं की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयातही शिक्का मोर्तब झालं आहे.” त्यामुळे ओबीसी समाजाचा आरक्षणावरचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

✦ जरांगेंना धक्का?

राज्य सरकारने जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य करून त्यांचे उपोषण सोडवले. पण ओबीसी नेत्यांनी सुरुवातीपासूनच या निर्णयाचा विरोध दर्शवला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आता प्रकाश आंबेडकरांचं मतही जरांगेंच्या भूमिकेला धक्का देणारं ठरत आहे.

✦ भाजपवर तीव्र टीका

आंबेडकरांनी थेट भाजपवर टीका केली. “निझामी मराठे जे सत्तेत आहेत तेच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आरक्षण असू नये असा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतिय जनता पक्ष म्हणतो की आमचा डीएनए ओबीसी आहे; पण ओबीसींनी हे लक्षात ठेवावं की त्यांचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

✦ ओबीसींना राजकीय संदेश

“मंडल आयोग वाचवणं हे आता ओबीसींच्या हातात आहे. दोन-चार ओबीसी सदस्य जिल्हा परिषदेत पाठवण्यापेक्षा संपूर्ण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. ओबीसींनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केलं नाही तर त्यांचं आरक्षण धोक्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आंबेडकरांनी दिला.

✦ मराठा समाजाला न्याय पण ताट वेगळं

यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या टीममधील वकिलांचा उल्लेख केला. “त्यांनी दिलेले कायदेशीर सल्ले जरांगेंनी मान्य केले नाहीत. मराठा समाजाला न्याय मिळायलाच हवा; पण त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. ओबीसींचा हक्क अबाधित राहील याची काळजी घेतली पाहिजे,” असा पुनरुच्चार आंबेडकरांनी केला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??