जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्यात महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला? ; जानेवारीत मतदानाची शक्यता…

मुंबई : राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा तिढा अखेर सुटला असून, या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिल्याने, निवडणूक आयोगाने प्राथमिक नियोजन सुरू केले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर २२ किंवा २३ जानेवारीला निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकांच्या तारखा १ ते १० डिसेंबरदरम्यान अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.

रखडलेल्या महापालिका…

पुण्यासह राज्यातील तब्बल २३ महापालिकांची मुदत मार्च २०१७ ते २०२२ या कालावधीत संपली आहे. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या नमुन्यानुसार ओबीसी आरक्षण कायम ठेवत निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे.

प्रभाग रचना व आरक्षण सोडत…

निवडणुकांसाठीची प्राथमिक तयारीही वेगाने सुरू आहे.

३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार.

१० ऑक्टोबरला प्रभाग रचनेची आरक्षण सोडत काढली जाणार.

सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर केल्या जातील.

२५ ते ३० नोव्हेंबरपूर्वी या याद्या अंतिम करण्यात येणार आहेत.

डिसेंबरमध्ये आचारसंहिता…

निवडणूक प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण करायची असल्याने १० डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत मतदान व निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्येच आचारसंहिता लागू होणार आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी शेवटची संधी…

या घडामोडींनंतर महापालिकेच्या पायरीवर पाऊल ठेवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. आता फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांना नवरात्रीच्या मुहूर्तावरच प्रचाराची सुरुवात करावी लागणार आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??