जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

आषाढी एकादशीसाठी रेल्वेकडून दोन विशेष गाड्या…

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूर आणि दादर दरम्यान दोन आषाढी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या गाड्या २२ ते २९ जुलै या कालावधीत धावणार असून, दादर येथून शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१०४५) सोडण्यात येणार आहे.

ही गाडी त्याच दिवशी रात्री नऊ वाजून १५ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर, पंढरपूर येथून रविवारी (२६ जुलै) मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१०४६) सुटणार असून, त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दादर येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.

या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे आहेत. तर दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी डबे, अशी या गाड्यांची रचना आहे.

दरम्यान, आषाढी एकादशीला येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, https://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा एनटीइएस ॲपवर संपर्क करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

आरक्षण कसे करायचे ?

गाडी क्रमांक ०१०४५ आणि गाडी क्रमांक ०१०१४६ या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करता येणार असून, https://www.irctc.co.in या संकेतस्थळावरही आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याशिवाय रेलवन ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??