कृषी व्यापार

कायदेशीर पद्धतीने जमिनीची खाते फोड कशी करावी? जाणून घ्या माहिती..

स्वत:चा हक्क असतानाही शेतजमीन मिळत नाही का?

मुंबई : सध्या शेतजमीन हा विषय वादाचा मुद्दा झाला आहे. शेती आणि शेतजमिनीवरुन मोठ्या प्रमाणात मतभेद पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात भांडणे होऊन प्रकरण पोलिस आणि न्यायालयापर्यंत जाते.

एकत्र कुटुंब पध्दत अगदी कमी प्रमाणात राहिली आहे. त्यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. नवीन पिढी शिक्षण आणि नोकरी निमित्त शहरात जाऊ लागले आहेत. असे असताना शेत जमीन कोणी करायची? तसेच शेतीतून पिकलेल्या उत्पादनाची विभागणी कशी करायची हा एक प्रश्न कायम आहे. त्यात बऱ्याच लोकांना खातेफोड पद्धत कशी आहे हे माहित नाही. खाते फोड म्हणजे एक प्रकारे जमिनीची वाटणी केली जाते. तसेच खाते फोड केल्याशिवाय सरकारी अनुदान आणि योजनांचा लाभ मिळत नाही. मग आता ही खातेफोड कशी केली जाते? हेच आपण जाणून घेणार आहोत.

                खाते फोड म्हणजे काय?

शेतीतील वाद मिटवण्यासाठी खातेफोड ही केली जाते. महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार जमिनीचे खाते फोड केली जाते. यासाठी संबंधीत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली जाते. एकदा अंतिम निर्णय ठरला की लगेच कच्चा आराखडा तयार केला जातो.

जमीन खातेफोड प्रक्रियेमध्ये जेवढे जमीनधारक व्यक्ती आहेत. त्यांच्या मुलांची संमती आवश्यक असते. एकूण व्यक्तींपैकी एकाने जरी संमती दिली नाही तरी खाते फोड होऊ शकत नाही. त्यामुळे पुढील शासकीय प्रक्रिया करण्याआधीच कुटुंबातील सदस्यांची परवानगी घेणे महत्वाचे ठरते.

      खाते फोड करण्यासाठी आवश्यक माहिती

खाते फोड करण्याचा एक दहा पानी फॉर्म असतो. त्यामध्ये जमिनीचा तपशील देणे अनिवार्य असते. जसे की, जमिनीचे एकूण क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेशपत्र, कुटुंबातील सर्वांचे प्रतिज्ञापत्र अंतीम आदेश इत्यादी.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??