क्राईम न्युज

फायनान्स कंपनीचा कारनामा ; घर गहाण ठेवूनही कर्ज देण्यास नकार.. फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या;

सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे (शिरुर) : तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हरिभाऊ गायकवाड (वय-५३) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्रातील फायनान्स कंपनी ग्राहकाला नाहक त्रास देत असतात. असे कितेक उदाहरण ताजे असताना तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली.
            फायनान्स कंपनीने कर्जासाठी हरिभाऊ गायकवाड यांच. राहत घर गहाण ठेवून घेतले. कर्ज मंजूर न करता सुरवातीचे हप्ते भरून घेतले. मात्र, कर्ज दिले नाही. कर्ज न देता फायनान्स कंपनीने अक्षरशा दमदाटीच्या जोरावर काही हफ्ते गुंडगिरी प्रमाणे हरिभाऊ गायकवाड यांच्या कडुन वसुल ही केले.
         या प्रकरणी महिंद्रा फायनान्स कंपनीच्या दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज दिलीप पवार आणि महेंद्र पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींचे नाव आहेत. याबाबत शीतल गायकवाड (वय-४३) यांनी फिर्याद दिली आहे.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असल्याने त्यांनी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीमध्ये सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फायनान्स कंपनीला (माॅरगेज) म्हणून घराचे कागदपत्र देत घराचे गहाणखत फायनान्स कंपनीच्या नावावर करून दिले. त्यानंतर कंपनीने त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून काही हप्तेदेखील भरण्यास सांगितले. परंतु कर्जाच्या रकमेचा चेक हरिभाऊ गायकवाड यांना दिला गेला नाही. त्यानंतर ते वेळोवेळी फायनान्स कंपनीत गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. हरिभाऊ गायकवाड यांना पुणे येथील कार्यालयात बोलावून घेऊन कर्ज देणार नाही आणि घराचे ही गहाणखत बदलणार नाही, अशी धमकीही दिली. यातूनच हरिभाऊ गायकवाड यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
           याप्रकरणी पोलिसांनी सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??