सामाजिक

रिक्षाचालकांवर होणार कारवाई, भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी, ६५ रिक्षाचालकांना नोटिसा..

पुणे : रिक्षाचालकांविरोधात तक्रारीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरून आलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारल्याच्या आहेत. तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटिसा काढल्या आहेत.

       शहरात रिक्षाने प्रवास करताना बऱ्याच वेळा त्यांच्या उद्धटपणाचा अनुभव नागरिकांना येतो. पण, त्यांच्याबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न प्रवाशांसमोर होता. आरटीओमध्ये जाऊन अथवा ई-मेलद्वारे तक्रार करता येणे शक्य होते. परंतु तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट होती. त्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला. या क्रमांकावर गेल्या काही महिन्यांत रिक्षाचालकांच्या १३५ तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गैरवर्तनाच्या तक्रारी, जास्त पैसे घेणे अशा तक्रारी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

          हेल्पलाइनवरून रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्याची सोय आरटीओने दिली आहे. त्यावर काही तक्रारी येत आहेत. तसेच, रिक्षाचालकांबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आरटीओकडून रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये तपासणी करून सर्व प्रकारची कारवाई केली जाणार आहे. – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

अशी आहे आकडेवारी

एकूण तक्ररी – १३५

भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी – ६५

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??