ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी…

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता समाप्त होणार असून, त्यानंतर कोणत्याही स्वरूपाच्या प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमांसह इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांमध्येही जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम २८-ब (१) नुसार मतदानास सुरुवात होण्यापूर्वीच्या चोवीस तासांच्या कालावधीत कोणतीही सार्वजनिक सभा बोलावणे, भरविणे किंवा अशा सभेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी संबंधित मतदार विभागात कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार करता येणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ (घ) नुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतर तसेच मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाज माध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत.
तसेच या आदेशाच्या परिच्छेद १६ (ग) नुसार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता प्रचाराचा कालावधी संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच अन्य कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचार करण्यास पूर्णतः बंदी राहील, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व नियमांनुसार पार पडावी यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष, माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??